13/09/2022
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या जगाने कौतुक करावे, असे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या मातीत जन्म घेतलेले, सर्वांना आपलेसे वाटणारे, तेजस्वी, महाप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज....🚩🙏⚔️
शिवाजीराजांचे केवळ नाव ऐकले, घेतले तरी अभिमान वाटतो, गर्वाने मान ताठ होते. छत्रपती शिवाजी महाराज अतिशय चारित्र्यसंपन्न होते. जगाच्या इतिहासात हा एकमेव राजा आहे, ज्याच्या दरबारी कधी स्त्री किंवा नर्तकी नाचली नाही.
छत्रपती शिवाजी महाराज नेहमी 'रयतेचं स्वराज्य' असाच शब्द वापरत. स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी काही वैशिष्ट्ये शिवाजीराजांची सांगता येतील. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात आणि आजच्या काळातही प्रेरणादायक आहे.....❤️🔱🚩
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करताना अनेक अडचणी आल्या, समस्या आल्या. प्रत्येक टप्प्यावर अडचणींवर मात करूनच शिवाजी महाराज पुढे गेले.
समस्या आहेत, अपयश आले, म्हणून शिवाजी महाराज कधी निराश झाले नाहीत. तर जिद्दीने, चातुर्याने आणि बुद्धी वापरून शिवाजी महाराजांनी समस्यांवर मात करत प्रचंड यश संपादन केले आणि स्वराज्याची स्थापना केली. मोहिमा आखताना छत्रपतींनी बुद्धिचातुर्याचा चलाखीने उपयोग करून त्या फत्ते करून दाखवल्या.
सूरत मोहीम, आग्रा मोहीम, अफजलखान वध अशी अनेक उदाहरणे महाराजांच्या बुद्धिचातुर्याची देता येतील........⛰️🚩⚔️
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वात जादू होती. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी त्याला हसत हसत आनंदाने सामोरे जाण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. प्रत्येक मोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज तलवारी मिरवणाऱ्या धारकऱ्यांना 'मानकरी', भाला फेकणाऱ्या निष्णात सैनिकाचा 'भालेराव' अशी उपाधी देऊन गौरव करायचे......⛰️🚩⚔️
जीवावर उदार होऊन चढाई करणाऱ्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे. स्वराज्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांचा ते सन्मान करायचे.
DM FOR CREDIT
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹